पुण्यात जमावबंदीचे आदेश; ५ पेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध, १४ दिवस कडक नियम लागू

सण, मोर्चे आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा निर्णय; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क

पुणे : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. २१ जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पोलीस प्रशासनाच्या परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून होणारे मोर्चे, आंदोलनं, धरणे, तसेच आगामी सण आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राहावी, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत. पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, २१ जुलै रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून हे आदेश लागू होतील आणि ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ते लागू राहतील.

शस्त्रे, आक्षेपार्ह घोषणा आणि सोशल मीडिया पोस्टवरही लक्ष

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला शस्त्रे, तलवारी, काठ्या, सळ्या, दगड, ज्वलनशील पदार्थ किंवा सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्यांचे पुतळे जाळणे, चिथावणीखोर घोषणा देणे, आक्षेपार्ह भाषणे करणे, वादग्रस्त पोस्टर्स किंवा बॅनर्स लावणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरूनही अनेकदा गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रील्स किंवा पोस्टच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे, धमकी देणे किंवा गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नागरिकांना पोलिसांचे सहकार्याचे आवाहन

शासकीय कामासाठी तैनात कर्मचारी, अधिकृतपणे शस्त्र बाळगणारे अधिकारी तसेच कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई केली जाणार असून, आदेशाची मुदत संपल्यानंतरही संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे. सण-उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…