राज्यात पावसाचा कहर; ६३ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत

मुंबई : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मोठे नुकसान झाले आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत राज्यभरात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये ६३ नागरिकांचा मृत्यू झाला असून ७८ जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या निकषांनुसार प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, तर काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले. प्रशासनाकडून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू असून आपत्तीग्रस्तांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

पुणे कचरा डेपो दुर्घटनेची विधानसभेत माहिती

विधानसभेत बोलताना गिरीश महाजन यांनी पुण्यातील कचरा डेपो दुर्घटनेचाही उल्लेख केला. गेल्या ४७ वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. दीड दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

काही दिवसांत महिनाभराएवढा पाऊस

राज्यात काही दिवसांतच महिनाभराएवढा पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरांमधील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून आपत्कालीन उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

पावसामुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पुढील १५ दिवस पुरेल इतके धान्याचे किट देण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात सुमारे एक हजार नागरिकांना मदत साहित्य वितरित करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सात जिल्ह्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पावसामुळे झालेल्या मृत्यूंची कारणे

वीज पडून – २३ मृत्यू
भिंत कोसळून – २५ मृत्यू
दरड कोसळून – ६ मृत्यू
झाड पडून – ६ मृत्यू
पुरामुळे – ३ मृत्यू
एकूण मृत्यू : ६३

याशिवाय पावसामुळे सुमारे २०० जनावरांचा मृत्यू झाला असून १० जनावरे जखमी झाली आहेत. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…