महाराष्ट्रात मॉन्सूनची एंट्री निश्चित? ७-८ जूनदरम्यान आगमनाची शक्यता

मुंबई : नैऋत्य मॉन्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल वेगाने सुरू असून येत्या ७ ते ८ जूनदरम्यान तो राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हवामान विभागाच्या विविध अंदाज मॉडेल्सनुसार मॉन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अनुकूल वातावरण तयार झाले आहे.केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी परिसरात मॉन्सूनसदृश ढगांची घनता वाढत असल्याचे उपग्रह निरीक्षणांमधून स्पष्ट झाले आहे. तसेच कोची येथील डॉपलर रडारमध्ये मध्यम तीव्रतेचे ढगांचे पट्टे दिसून येत असल्याने मॉन्सूनच्या पुढील प्रवासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशांत महासागरातील ‘टायफून जांगमी’चे रूपांतर बाह्यउष्णकटिबंधीय कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यामुळे नैऋत्य मॉन्सूनच्या वाऱ्यांना उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मॉन्सूनच्या मुख्य प्रवाहाला वेग मिळत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनचा पट्टाही अधिक सक्रिय होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूचे उर्वरित क्षेत्र तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यामुळे दक्षिण कोकण, गोव्यालगतचा दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रारंभीच्या मॉन्सून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील अधिकृत प्रवेशाकडे लागले आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…