अमरावतीत नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक अत्याचार; मैत्रिणींचा सहभाग उघड

अमरावती : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका युवतीला जाळ्यात ओढून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी करण सुदर्शन मनोहर (२७, प्रिया कॉलनी, महादेवखोरी) आणि साहिल ऊर्फ गोलू अरुण अंभोरे (२६, वरुणनगर, अमरावती) यांना अटक केली आहे. तसेच या कटात दोन युवतींचाही सहभाग असल्याचे तपासातून उघड झाले आहे.
पीडित युवतीला नोकरीची गरज असल्याने तिच्या मित्राने तिची ओळख एका युवतीसोबत करून दिली होती. संबंधित युवतीने तिचा विश्वास जिंकत तिला आपल्या खोलीवर नेले आणि नंतर दुसऱ्या युवतीशीही ओळख करून दिली. त्यानंतर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तिला शहरातील दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे काही व्यक्तींशी संबंध ठेवल्यास भरपूर पैसे मिळतील, असे तिला सांगण्यात आले. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला.
यानंतर ती एका मैत्रिणीकडे राहण्यासाठी गेली. दोन दिवसांनंतर मैत्रीण गावाला जाणार असल्याने तिने पीडितेला पुन्हा नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या युवतीच्या ताब्यात दिले. संबंधित युवतीने पीडितेला दुचाकीवरून नेताना मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत एका घरात नेले. त्या ठिकाणी साहिल ऊर्फ गोलू अंभोरे आणि करण मनोहर उपस्थित होते.
तक्रारीनुसार, संबंधित युवती तेथून निघून गेल्यानंतर साहिल आणि करण यांनी पीडितेला धमकावत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन्ही आरोपींसह कटात सहभागी असलेल्या दोन युवतींविरुद्ध अपहरण, अत्याचार आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…