भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; काँग्रेस उमेदवारांची माघार, तिरंगी लढत निश्चित

भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड आणि प्रफुल अग्रवाल यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलले आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि दोन अपक्ष उमेदवार यांच्यात थेट तिरंगी सामना रंगणार आहे.काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांच्या माघारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणे आणि आरोप-प्रत्यारोप समोर येत होते. या घडामोडींमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, महायुतीच्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अज्ञात स्थळी ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांच्या जिल्ह्यांकडे रवाना करण्यात येत असल्याचे समजते.काँग्रेसच्या माघारीनंतर आता भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यासमोर दोन अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहिले असून या तिरंगी लढतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…