देऊळ बंद 2’च्या यशाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; फडणवीसांनी टीमचे केले कौतुक

मुंबई : प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानंतर ‘देऊळ बंद 2’च्या संपूर्ण टीमने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक करत टीमच्या कामगिरीचे अभिनंदन केले. मुंबई येथे पार पडलेल्या या भेटीत त्यांनी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकद या चित्रपटात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद आनंददायी आहे.” तसेच त्यांनी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीला निर्माते कैलाश वाणी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच पीआर आणि मार्केटिंग क्षेत्रातील कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना प्रवीण तरडे म्हणाले की, “प्रेक्षकांनी चित्रपटावर दाखवलेले प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेले कौतुक आणि दिलेली शाबासकी संपूर्ण टीमचा उत्साह वाढवणारी आहे.”
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक ‘देऊळ बंद 2’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांकडे गर्दी करत असून दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची यशस्वी घोडदौड कायम आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…