धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली धोक्याची पातळी; कल्याण-डोंबिवलीसह नदीकाठच्या भागांसाठी हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नदी-नाल्यांवरही दिसून येत आहे. मुंबई आणि धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्याने कल्याण-डोंबिवलीसह नदीकाठच्या भागांसाठी प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाणीसाठा २८.९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा पाणीसाठा मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी पुढील ३६ दिवस पुरेल, अशी माहिती देण्यात आली आहे.गेल्या काही तासांत उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीने इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित सर्व यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

सकाळी ७.३० वाजताच्या नोंदीनुसार उल्हास नदीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे :

सद्यस्थिती : १७.५० मीटर

इशारा पातळी : १६.५० मीटर

धोक्याची पातळी : १७.५० मीटर

पावसाची नोंद (१६:०० वाजेपर्यंत) :

आजचा पाऊस : २९ मिमी

एकूण पाऊस : ६९८ मिमी

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…