लग्नपत्रिकेवर वधू-वरांची जन्मतारीख अनिवार्य होणार? बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा विचार

राज्यातील वाढत्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यानुसार भविष्यात लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक केले जाऊ शकते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राजस्थानमध्ये यापूर्वी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा प्रस्ताव अभ्यासाधीन असल्याचे समोर आले आहे. पावसाळी अधिवेशनात बालविवाहासंदर्भातील लेखी उत्तरात सरकारने याबाबतची माहिती दिली.सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या जास्त आहे. परभणी, बीड, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक मुलींची लग्ने १८ वर्षांपूर्वी झाल्याचे आढळून आले आहे. बीडमध्ये हे प्रमाण ४३.७ टक्के, धुळ्यात ४०.५ टक्के तर सोलापुरात ४०.३ टक्के असल्याची माहिती सरकारने दिली.
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायद्याची अंमलबजावणी, विविध नियम आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत.याच पार्श्वभूमीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू असून, याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते. बालविवाह रोखण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…