“पूरमुक्त मुंबईचा संकल्प! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर महापालिकेची करडी नजर”.

मुंबईला पूरमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पंपिंग स्टेशन आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे बळकटीकरण करण्यासोबतच पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पावसाच्या काळात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. शहरातील नालेसफाईची कामे जवळपास पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याशिवाय जलनिस्सारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात येत असून, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…