कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी-स्कॉर्पिओ धडकेत ४ ठार, ४ जखमी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे-टोकावडे परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याणहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसची समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे वळणाजवळ हा अपघात घडला. बस व स्कॉर्पिओची धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…