कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी-स्कॉर्पिओ धडकेत ४ ठार, ४ जखमी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे-टोकावडे परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याणहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसची समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे वळणाजवळ हा अपघात घडला. बस व स्कॉर्पिओची धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…