योगातून आरोग्य, सत्संगातून संस्कार; लोह्यातील पतंजली योग समितीचा आदर्श उपक्रम

लोहा, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी) : लोहा शहरात पतंजली योग समितीच्या वतीने मागील २७ वर्षांपासून अविरतपणे योग आणि सत्संगाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्यासोबतच संस्कारांची जपणूक करणारा हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे.

लोहा शहरातील वीर माधवराव नळगे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परिसरात पतंजली योग समितीच्या वतीने दररोज सकाळी ५ ते ७ या वेळेत नियमित योग वर्ग घेतला जातो. शहरातील योग शिक्षक हरिभाऊ खोडके, विश्वंभरराव वाडेवाले (टेलर) व मोहन पवार हे योगसाधकांना योगासने व प्राणायामाचे प्रशिक्षण देतात. या योगवर्गात बालाजी जाधव, अशोक जगताप, शिवकांत स्वामी, रामराव जिंके, गोविंद फुलवरे, पांडुरंग मुलुकपाडे, नागेश दमकोंडवार यांच्यासह सुमारे २५ ते ३० योगसाधक सातत्याने सहभागी होतात. ‘योगातून निरोगी आरोग्य’ हा संदेश देत नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती केली जाते.

दर रविवारी सकाळी ७ वाजता समितीच्या सर्व साधकांच्या वतीने सत्संगाचे आयोजन करण्यात येते. या वेळी शुद्ध आयुर्वेदिक खिचडी व आयुर्वेदिक कढी असा पौष्टिक व आरोग्यदायी प्रसाद दिला जातो. योग व सत्संगाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्माकर पालीमकर, रेश्माजी दांगटे, देवराव वसमतकर यांच्यासह स्वयंसेवी योगसाधक विशेष परिश्रम घेत आहेत. दि. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या रविवारच्या सत्संगासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष मोहन पाटील पवार हे दाते होते.

या सत्संग कार्यक्रमास लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक प्रतिनिधी राजेश बोडके, मधु पाटील पवार, कांता बिडवई, श्याम पाटील नळगे, राजू पाटील पवार, गजानन पवार, पत्रकार हनुमंत पांचाळ, सुनील चव्हाण, संजय कोटलवार यांच्यासह मोठ्या संख्येने योगसाधक व नागरिक उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…