नागपुरातील ऑटो एलपीजी स्वस्त; दरात 5 रुपयांची कपात, चालकांना दिलासा

नागपूर : वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक ताण सहन करणाऱ्या ऑटोचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात ऑटो एलपीजीच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची कपात करण्यात आली असून, त्यामुळे गॅसचा दर 120 रुपयांच्या पुढील पातळीवरून आता 95 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावपूर्ण परिस्थिती आणि आखाती देशांतील युद्धजन्य वातावरणाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला होता. एलपीजीच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने दर झपाट्याने वाढले होते. याचा सर्वाधिक फटका ऑटोचालकांना बसला होता. वाढलेल्या इंधन खर्चामुळे दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होत असल्याची तक्रार चालकांकडून केली जात होती.
मात्र आता एलपीजीचा पुरवठा पूर्ववत होत असल्याने दरात घट झाली आहे. प्रति किलो 5 रुपयांची कपात झाल्याने ऑटोचालकांचा इंधनावरील खर्च कमी होणार असून, त्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. शहरातील हजारो ऑटोचालकांसाठी ही कपात महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, इंधन क्षेत्रात गेल्या महिनाभरात मोठ्या चढ-उतारांचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोलच्या दरातही मागील महिन्यात सुमारे 7 रुपयांची वाढ झाली होती. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत नुकतीच 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती. अशा परिस्थितीत ऑटो एलपीजीच्या दरात झालेली घट ही सामान्य नागरिकांसह ऑटोचालकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
पुरवठा सुरळीत राहिल्यास आगामी काळात इंधनाच्या किंमती आणखी स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

LPG ग्राहकांना महागाईचा आणखी फटका; गॅस सिलिंडर महाग, अनुदानित सिलिंडरची संख्या घटली

देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात एलपीजी संदर्भात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे घरगुती ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवरही अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली…

नागपुरातील रस्त्यांवर हायकोर्टाचा सवाल; “मेट्रोसिटी म्हणायचं, पण रस्त्यांची ही अवस्था का?”

नागपूर : शहरातील काँक्रीट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत…