बकोरे परिवाराचे प्रेरणादायी कार्य, जनजाती कल्याण आश्रमाला देणगी

छोट्या छोट्या उपक्रमातून आई-वडिलांप्रति कृतज्ञता व गरजूंसाठी यथाशक्ती मदत ही कृती नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी.

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  कैलासवासी हरिभाऊ बकोरे यांच्या स्मरणार्थ ८५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंबीय श्रीमती सुमती बकोरे, मुलं अभिजीत व अशोक बकोरे आणि नातू गंधार यांनी जनजाती कल्याण या संस्थेला रुपये ११ हजारांची देणगी दिली. यावेळी देणगी स्वीकारताना आश्रमाचे श्रीकांत आपटे, डॉ. नीलकंठ ठाकरे, विशारद पेटकर आणि अनंत पुंड उपस्थित होते. जनजाती कल्याण आश्रम ही संस्था वनवासी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या समाजासाठी विविध सेवा कार्य आणि उपक्रम राबवते. या संस्थेचे हजारो सेवा प्रकल्प देशभरामध्ये कार्यरत आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जनजाती कल्याण आश्रमाचे डॉ. नीलकंठ ठाकरे यांनी जनजाती कल्याण आश्रमाचे सेवाकार्य, विविध उपक्रम आणि इतर सर्व योजनांबाबतची माहिती सांगितली. जनजाती कल्याण आश्रमामार्फत हजारो वनवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. सामाजिक जाणीव जपणाऱ्या सर्वांनी या जनजाती कल्याण आश्रमासाठी पैसे, वस्तू व इतर स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देणगी आणि मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला स्टार हेल्थमध्ये विमा प्रतिनिधी / सल्लागार म्हणून काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…