दोन वर्षांनंतर पेट्रोल-डिझेल दरात कपात; वाहनधारकांना मोठा दिलासा

देशभरातील वाहनधारकांसाठी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खासगी क्षेत्रातील इंधन विक्रेता कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची कपात केली आहे. १ जुलै २०२६ पासून कंपनीच्या देशभरातील सुमारे ७ हजार पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू झाले आहेत. गेल्या दोन वर्षांतील ही पहिली दरकपात असल्याचे सांगितले जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर ७० डॉलरच्या आसपास आले. त्यानंतर जागतिक बाजारातील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपांवर पूर्वीचेच दर कायम आहेत. सरकारी कंपन्यांच्या पंपांवर सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रतिलिटर, मुंबईमध्ये पेट्रोल १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल ११३.४७ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल १०७.७६ रुपये आणि डिझेल ९९.६६ रुपये, तर बंगळुरूमध्ये पेट्रोल ११०.८९ रुपये आणि डिझेल ९८.८० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्रात सरकारी कंपन्यांच्या पंपांवर मुंबईमध्ये पेट्रोल १११.१८ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये, नागपुरात पेट्रोल १११.८० रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये, पुण्यात पेट्रोल ११२.०४ रुपये आणि डिझेल ९८.६८ रुपये, अमरावतीमध्ये पेट्रोल ११२.८९ रुपये आणि डिझेल ९९.५४ रुपये, नाशिकमध्ये पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल ९९.०७ रुपये, ठाण्यात पेट्रोल १११.३८ रुपये आणि डिझेल ९८.०० रुपये, तर कोल्हापुरात पेट्रोल ११२.५७ रुपये आणि डिझेल ९९.२३ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…