नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कै. पी. आर. जोशी स्मृती आंतरशालेय इंग्रजी निबंध लेखन स्पर्धेत दोन प्रथम क्रमांक पटकावले.
हडस हायस्कूल (इंग्रजी माध्यम), नागपूर येथे ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील १८ शाळांनी सहभाग घेतला होता. इयत्ता आठवीच्या गटात कु. ऋतुजा खंडारे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इयत्ता नववीच्या गटात कु. पवनी गडपेले हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने तसेच मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक राहुल घोडे आणि शैलेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.


