परतीचा पाऊस न आल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची मागणी

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झालेली असून कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. परंतु पावसाची फक्त दोनच नक्षत्रे उत्तरा व हत्ती बाकी असताना अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे.

तालुक्यातील उत्तरेकडील भाग अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून विहिरींमध्ये पाणी राहिलेले नाही. शेतातील सोयाबीन, बाजरी, मका इत्यादी पिके करपण्याच्या मार्गावर असून त्यातून उत्पादन मिळेलच याची शाश्वती नाही.

जर परतीच्या पावसाने पाठ फिरवली तर सरकारने कृत्रिम पावसाचा विचार करावा, अशी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. असे शेतकरी पंडित गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग आत्तापासूनच करणे गरजेचे आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

वरदविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोला येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थानात श्री गणपती बाप्पाच्या आगमना निमित्ताने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोनखेडचा रास्ता रोको रद्द; शेतकऱ्यांचा प्रशासनावर विश्वास

नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व हळद पिकांना 100 टक्के पीकविमा नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या प्रमुख…