जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळणार

जिल्ह्यातील १,०१,३३१ तर तिवसा तालुक्यातील ४,३११ विद्यार्थी होते वंचित

तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील एकूण १,०१,३३१ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी दुसरा गणवेश व बुटांपासून वंचित होते. १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना चपला घालून स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला होता. यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट रोजी तिवसा गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्या कार्यालयात अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसाठी तातडीने दुसरा गणवेश आणि बूट खरेदीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२६-२७ गणवेश योजनेंतर्गत गणवेश तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर २१ ऑगस्ट रोजी तिवसा दौऱ्यावर आले होते. यावेळी १४ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ज्या पालकांनी स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी केले आहे, त्यांना खर्चाची भरपाई देण्यात यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साहित्याचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपये, तर त्यापैकी तिवसा तालुक्यासाठी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसरा स्काऊट-गाईड गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून, विद्यार्थ्यांना लवकरच दुसरा गणवेश मिळणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…