रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या युद्धात सहभागी झालेल्या १० भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की, मृत सर्व भारतीय नागरिक रशियन सैन्यात स्वेच्छेने करार करून सहभागी झाले होते. दरम्यान, २६ भारतीयांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत नोकरीच्या आमिषाने रशियात नेऊन फसवणूक करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने युद्धात ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


