KOLHAPUR | कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरून कोल्हापुरात वाद

कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आणि इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. या निषेधार्थ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने आज सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण सध्या तापलेलं असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    NAGPUR | नागपुर शिवसेना शिंदे गुट की बड़ी समीक्षा बैठक, प्रतापराव जाधव बने नए संपर्क मंत्री

    नागपुर जिला और ग्रामीण शिवसेना की इस अहम बैठक की शुरुआत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे और आनंद दिघे के पूजन से हुई। मंच पर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव के साथ राज्यमंत्री…

    NAGPUR | बच्चू कडू के आने पर पार्टी लेगी फैसला : दीपक सावंत

    नागपुर में दीपक सावंत ने बच्चू कडू के मुद्दे पर कहा कि अंतिम निर्णय पार्टी लेगी। साथ ही मराठी भाषा अनिवार्यता पर जोर देते हुए उन्होंने संगठन और मतदाता सूची…