कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा आणि इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप शिवभक्तांकडून करण्यात येत आहे. या निषेधार्थ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ने आज सकाळी 11 वाजता शिवाजी चौकात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण सध्या तापलेलं असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


