नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अशोक खरात यांच्या जमीन व्यवहारावर गंभीर आरोप झाले आहेत. कोटींच्या किमतीची जमीन अवघ्या लाखांत खरेदी केल्याचा दावा करण्यात येतो आहे. विशेष म्हणजे, अटकेच्या दिवशीच या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध झाली. इतकंच नाही, तर खरात कोठडीत असतानाच अवघ्या महिन्याभरात फेरफार नोंद मंजूर झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणामुळे आता ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाशी संबंधित चर्चांना देखील उधाण आलं आहे.


